स्वयंशिस्त
आपण स्वयंशिस्तीचा योग्य प्रकारे अंगीकार केल्यास कोणत्याही
प्रकारच्या समस्येवर उपाय शोधणे व मात करणे सोपे जाते. ही
स्वयंशिस्त
धारण करण्यासाठी आपल्याला खालील मुद्दे लक्षात घ्यावे लागतील व
समस्येवर मात करण्यासाठी कृति आराखडा तयार करून त्याची काटेकोरपणे
अंमलबजावणी करावी लागेल. यामध्ये खालील मुद्दे महत्वाचे आहेत
१) प्राणायाम व दीर्घ श्वसनाद्वारे मनावर ताबा मिळविणे
आपल्या जीवनात कोणतीही समस्या निर्माण झाल्यास प्रथम
आपला श्वासोच्छवास जलद गतीने होऊ लागतो. आपल्या नाडीचे ठोके
वाढतात व छाती धडधड करू लागते. या तीनही गोष्टींमुळे आपले मन
प्रचंड अस्वस्थ बनते व काय करावे हे आपल्याला सुचत नाही. अशा
परिस्थितीत स्वयंशिस्तीद्वारे आपण प्रथम करावयाची गोष्ट म्हणजे या
अडचणीवर मात करण्यासाठी आपल्याला आपले मन शांत ठेवायचे आहे व
स्थिर बुद्धीने विचार करून या समस्येवर आपल्याला मात करायची आहे,
असा ठाम विश्वास आपण मनाशी बाळगला पाहिजे.
त्यानंतर आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी शांत बसून ३ ते ४
मिनिटे दीर्घ श्वास छातीमध्ये भरून घेतला पाहिजे आणि हळूहळू
उच्छवास
सोडला पाहिजे. ही क्रिया म्हणजेच दीर्घ श्वसन आणि प्राणायाम किमान
१० ते
१५ वेळा केली पाहिजे असे केल्याने आपल्या श्वासोच्छ्वासामध्ये एक
प्रकारची
स्थिरता येईल व त्यायोगे आपल्या मनाची स्थिरता साधणेदेखील आपल्याला
शक्य होईल.
२) श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करणे आणि मनाला विचारप्रवण करणे
-
संकटातील प्रसंगात आपल्या मनाची एकाग्रता साध्य करण्यासाठी
आपण आपल्या श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे व त्यायोगे
विचार प्रवण केले पाहिजे. आपण श्वासोच्छवासाच्या गतीवर लक्ष
केंद्रित
केल्यास आपल्या मनात अन्य कोणतेही विचार येणार नाहीत व आपले मन
स्थिर बनण्यास त्यामुळे मदत होईल.
अशा प्रकारे मनाचे स्थैर्य प्राप्त केल्यावर समस्येवर कशा प्रकारे
मार्ग काढावा याबाबत विचार करण्यास आपल्या मनाला प्रवृत्त करू
शकतो.
३) समस्येच्या कालावधीत मन स्थिर ठेवणे -
इंग्रजीमध्ये असे एक वचन आहे, की “Everything take its own
time & we should
provide sufficient time to that thing in
order to overcome the
situation."
याचा अर्थ असा आहे की, "या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट पूर्ण
होण्यास
काही ठराविक वेळ लागतो आणि आपण पुरेसा संयम ठेवून त्या त्या
गोष्टीस योग्य
तो वेळ दिलाच पाहिजे. आपण असे केले तरच जीवनात निर्माण होणाऱ्या
घटना
आणि प्रसंग यावर आपल्याला यशस्वीपणे ताबा मिळविता येईल."
आपल्या जीवनात निर्माण होणाऱ्या समस्यांचेही असेच असते. प्रत्येक
समस्या आपल्या जीवनात काही विशिष्ट काळ टिकून राहते. एखादी समस्या
तास-दोन तास टिकून त्यावर आपल्याला उपाय सापडतो आणि त्यानंतर
त्या समस्येचे निराकरण करता येते. दुसरी एखादी समस्या ३-४ दिवस ठाण
मांडून राहते. त्यावरही उपाय योजून आपण त्या समस्येचे निराकरण करू
शकतो. तिसरी एखादी चिवट समस्या दोन-तीन महिन्यांसाठी आपल्या
जीवनात येऊन आपल्याला त्रस्त करीत असते. मात्र आपण शास्त्रशुद्ध
पध्दतीने विचार करून त्या समस्येवरही मात करू शकतो आणि तिचे
निराकरण करू शकतो.
टायफॉईडमुळे तुम्हाला महिनाभर आराम करावा लागेल,